पावसाळा म्हटलं की तसे सगळेच मनातून ओले आणि प्रसन्न होतात. पावसाचा Fanclub Open केला तर नागड्या मुलापासून तो मिशी पिकलेल्या म्हाताऱ्यापर्यंत सगळेच त्याचे Fan असतील. लहानांना तर water bottle मधलं पाणी कपड्यांवर सांडलं की जमत नाही पण हेच जर पावसात भिजून ओल्या uniform मध्ये बसायला जमत. मोठेही तसे काही फार मागे नाहीत, घड्याळाचे काटे आणि Railway timing तंतोतंत जुळलं नाही की Indian Railway ला शिव्या घालणारे पावसाळ्यात मात्र Railway चा track पाण्यात किती बुडालाय हे पाहण्यात तासोनतास गाडीत पडून राहतील. तसा किती नाही म्हंटला तरी पाऊस सगळ्यांच हवासा वाटतो. पण एक दिवसं असा होता त्या दिवशी तो बऱ्याच जणांना नकोसा झाला होता.
College मधून visit साठी मुलुंडच्या एका mall मध्ये आलो होतो. पाऊस तसा पहाटेपासूनच पडत होता. ११ वाजेपर्यंत सगळ्यांनीच mall गाठला. कृष्णा बरोबर होते. तासभर हुंदडून काय करायची ती visit केली. ठरवून पडल्यासारखा पाऊस कोसळतच होता. सर थोडे काळजीत होते, 'अरे पोरानो पाऊस पडतोय लवकरच घरी पळा'. सरांचे ऐकू, इतके आज्ञाधारक आम्ही कधीच नव्हतो. सर तर निघाले पण पोरांना shopping ची खाज आली होती.सगळ्यांनी आपापल्या दुकानांच्या वाटा धरल्या. बाहेर कसाला तरी गोंधळ ऐकून आमच्यातला एकाने mall मध्ये पाणी शिरलंय असा शोध लावला. सगळेच बाहेर आले आणि आधी धाव ठोकली ती पहिल्या मजल्यावर. सुरुवातीला अरे पाणी .. पाणी ... असं करत गंमत चालली होती, पण वेळीच बाहेर पडलो नाही तर आतच अडकू हे कळल्यावर गुमान सगळे साठलेल्या पाण्यातून वाट काढत रोडवर आलो. रोडवर सुधा नदी झाली होती. सगळेच थोडे विचलित झाले होते. हा काय प्रकार आहे ? हा सगळ्यांनीच मनाला विचारलेला प्रश्न होता. लगेचच सगळ्यांची एक meeting झाली, एकमताने एक निर्णय घेण्यात आला. त्यातल्या त्यात त्या ठिकाणापासून प्राजक्ता आणि निकिताच घर जवळ होत. मग काय ... अर्धी पलटण प्राजक्ताकडे व अर्धी निकीताकडे, दोन मोर्चे दोन दिशांना निघाले होते. प्रथम आम्ही Taxi, auto ने जाण्याचा विचार केला. अपयश हि यशाची पहिली पायरी असते. हे वाक्य सार्थ करत आम्ही Taxi, auto वैगरे मिळवण्यात अपयशी ठरलो होतो. बसेस तर overflow झाल्या होत्या. बिचारा कन्डकर आत गुदमरून जायची वेळ आली असेल त्याच्यावर. बस जगाची हलत नव्हती आणि आत बसलेली लोकं सुधा. वरून पाऊस जोरदार कोसळत होता. एका छत्रीत तीन चार जण कोंबून आमचा मोर्चा हळूहळू पुढे चालला होता. बाजूचे दोन जण तर पार भिजत होते तरी छत्रीत डोकं खुपसलेलच. कसेबसे मुलुंड चेकनाक्यापर्यंत आलो. आमच्या मोर्च्यामध्ये मी, अजित, अमित, सुप्रिया, खुशबू, जान्हवी आणि निकिता असे सात धडाडीचे कार्यकर्ते होतो. आमच्यातला सगळ्यात उत्साही कार्यकर्ता अजित ह्याला कसली तरी आठवण झाली होती ... शिव्यांचा आलाप घेत त्याच गाणं चालू झाल होत. त्याने त्याची bike mall च्या पार्किंग मध्ये ठेवली होती आणि आता पार्किंग पाण्याखाली होतं. परत जाण्यात काही point नव्हता. हातात हेल्मेट नाचवत त्याने त्याचा सुपीक डोक्यातून एक idea काढली होती. त्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या वडिलांच्या कारखाना जवळच आहे . तिकडून कर घेऊन आपण काराने मुक्काम गाठूया असा ठराव मंजूर झाला. ह्या ठरावामुळे सुप्रियाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. चालून चालून पार वैतागून गेली होती. आता गाडी आणण्यासाठी अजित आणि मी निघालो बाकीचे तिथेच आराम फार्मावणार होते. कारखान्यात आल्यावर मेन गेटला कुलूप होत. गेट ओलांडून आत आलो गाडीचा पत्ता नव्हता पण कोपऱ्यातली सायकल आम्ही उचलली. अजितने त्याचे मुकुट (हेल्मेट) डोक्यावर चढवले. मी मागे छत्री घेऊन. आमची जय विरूची जोडी निघाली चेकनाक्याला. आमचा तो प्रकार एकूणच थोडा विचित्र होता. एकतर अजित हेल्मेट घालून सायकल चालवत होता मी मागे छत्री पसरून बसलो होतो. एकदम abstract painting झालं होत आमचं. त्या प्रकारामुळे सगळेच बऱ्याच वेळातून हसले होते.
संध्याकाळचे साधारण सहा साडे सहा वाजले निकिताच घर गाठायला. घरी लाईट नव्हते. maggi, jam bread, असा मेनू येताच त्याचा फडशा पाडण्यात आला. फोनच नेटवर्क नसल्याने घरी कळवणं शक्य नव्हतं. रात्रीचा मुक्काम इथेच आणि सकाळी आपापल्या घराकडे प्रस्थान, असे ठरले. पाऊस अजून थांबला नव्हता. दिवसभराच्या थकव्यामुळे सगळेच क्षणात आडवेही झालो. साधारण पहाटे ३:३० ला मला जागा आली. सहज पडदा सरकवून वातावरणाचा आढावा घेत होतो. गधड निळ्या रंगाचा प्रकाश, अधूनमधून चमकणारी वीज आणि पाण्याच्या थेंबांचा सर सर असा आवाज बस्स... एकूणच भयानक परिस्थिती तयार झाली होती. गपचूप पुन्हा चादर डोक्यावरून घेतली.
सकाळी आपापल्या घरी निघण्याच्या तयारीला जोर चढला होता. अजितने मला त्याच्या घरी येण्याची ऑफर दिली होती पण आजतरी घरी पोहचलो पाहिजे म्हणून मी माझ्या घरचाच रस्ता पकडला. ठाणे स्टेशन गाठले .... ट्रेन १००% बंद आणि बसेससाठी सिद्धीविनायाकापेक्षा मोठी रांग. आता रेल्वेचे स्लीपर्स मोजत track मधून चालत जाण्याचा मार्ग निवडला. कालचा दिवस सगळ्यांबरोबर असाच मजेत गेला होता आता एकटाच होतो. पण आज काही करून घर गाठायचं होत. घरी किमान एक फोन जरी लागला असता तरी थोड टेन्शन कमी झालं असतं. ह्या साठलेल्या पाण्यात तरी कसाबसा सावरलो असतो पण घरात काय चाललं असेल ह्या विचारात बुडून अगदीच गुदमरल्यासारख झालं होत. ठाणे ते डोंबिवली नेहमचा २० ते २५ मिनिटांचा प्रवास बराच मोठा वाटत होता. साडेबारा वाजले होते आणि पाठीवर bag सांभाळत मी ठाणे सोडले. एक एक स्लीपर्स मागे टाकत वेगात पायागडी चालू होती. मागे वळून बघितलं स्टेशनाचा तो पिवळा बोर्ड छोटासा दिसत होता. ३ ते ४ सेकंदात पार होणारा ब्रिज पार करायला पूर्ण ३ मिनिटे लागली. सगळं खूप लांब गेल्यासारख वाटत होत. track वरून continues चालत राहण तसं कठीणच. ५ मिनिटांचा ब्रेक घेतला. थांबल्यामुळे परत चालताना पाय जबरदस्त भरून आले होते. लांब तिकडे कळवा स्टेशन दिसत होते. थोडा हुरूप आला. आता एकाच गणित मी आणि स्टेशन ..फक्त अंतर तुडवायच होत. तरी कळवा स्टेशन यायला पाऊण तास खर्च झाला. आता मात्र दमाने छाती भरून आली, तसाच bag काढली आणि platform वर आडवा झालो. घराची गादी आठवली. ५ मिनीट तसाच डोळे मिटून पडून राहिलो. २० एक मिनिटांनी पुन्हा चालायला सुरुवात केली.
पुढचं स्टेशन होत मुंब्रा. लोकांची गर्दी आता जाणवत होती. समोर बरीच गर्दी दिसली काही लोकं चहा आणि बिस्कीट वाटत होते. एक पुडा मीही उचलला. आभार व्यक्त करत समोर दिसणाऱ्या भोगद्याकडे वळलो. भोगाद्यात गुडगाभर पाणी होत. भोगदा पार केल्यावर डाव्या हाताला असणारा रोड पूर्ण पाण्याखाली बाजूलाच असणाऱ्या लोकाच्या घरात पाणी जाऊन सगळं सामान बाहेर आलं होत. सगळेजण वर track वर येऊन बसले होते. डोळे फाडून मी ते दृश पहातच राहिलो. पाण्याचा असा कहर मी प्रथमच अनुभवला होता. प्रयत्न करून काहींनी आपलं अर्धमुर्ध समान वाचवलं होतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भीती आणि चिंतेचं ग्रहण वाढतच चाललं होतं. प्रत्येकजण एकमेकांना सावरण्याचा प्रयत्न करत होता. पावसाची विश्रांती संपली आता, पुन्हा जोराची सुरुवात झाली होती. अजून थोडं पुढे आल्यावर उजव्या हाताला लागून असलेल्या घरांमध्ये तीच परस्थिती होती. कालपर्यंत सुखात विसावलेली ती कुटुंब अचानक कोसळलेल्या पावसामुळे उघड्यावर आली होती. जमिनीत घट्ट रोवल्यासारखा मी तिथेच थांबलो होतो. आता मात्र घरच्यांची आठवण येत होती. घरी पोहोचायची घाई झाली. वीस मिनिटे चालल्यावर दुसरा भोगद्यापाशी आलो. ह्या ठिकाणी बऱ्यापैकी पाणी साठलं होतं. पाण्यात शिरलो, सुरुवातीलाच कमरेपर्यंत पाणी होतं. पायाखाली स्लीपर्सचा अंदाज घेत हळूहळू पुढे सरकत होतो. भोगद्याच्या मध्यभागी पाणी कामरेहूनवर आलं. आता bag डोक्यावर घेऊन चालण्याव्यतिरिक्त पर्याय नव्हता. खाली पायांना track चा अंदाज येत नव्हता. त्याच वेळेला पैशाचं पाकीट आणि मोबाईल jeans च्या poket मधेच होते. घाई घाईने तसेच ओले पाकीट आणि मोबाईल bag उघडून त्यात कोंबले. दरम्यान पाय दोन स्लीपर्स मधल्या खोल जागेत पडला आणि पाणी थेट गळ्यापर्यंत आले. bag ही पाण्यात पडली. पटकन सावरून चालू पडलो. छातीची धडधड वाढली होती. कधी एकदाचा बाहेर पडतोय असं झालं होतं. भोगद्याचा शाप संपला होता. इकडे तर झोपड्यांची वाट लागली होती. चिखल, गाळ, मोडलेल्या भिंती आपला तो विखुरलेला संसार वेचण्याचा तो प्रयत्न बघतांना माझी त्या घरासारखी मोडकलीची अवस्था झाली होती. सगळं मागे सारत वीस मिनिटात मुंब्रा गाठलं. माझ्या उभ्या आयुष्य असं दृश्य मी कधीच पाहिलं नव्हतं ते त्या ब्रिजवरून मी त्यावेळी पाहिलं. मी ज्या ब्रिजवर होतो त्याखाली किमान ४० फुट खोल पाण्याची पातळी असते आज ती फक्त ४ ते ५ फुटांची होती. पाण्याची पातळी किती वाढली ह्याचा अंदाज करणंच कठीण होतं. अशा पाण्याच्या थैमानामुळे track मधून दिवा स्टेशन चालत जाण्याचा विचारच करवत नव्हता. परत मागे जाणे अशक्य होते. १० मिनिटे त्या ब्रिजवर मी तसाच उभा होतो. एक पाऊलही माझ्याने पुढे पडले नव्हते. आता एकाच मार्ग होता रोडने चालत जाण्याचा. मुंब्रावरून शिळफाटा, शिळवरून निळजे, निळजेवरून लोढा मग प्रीमियर कंपनी मग मानपाडा, डोंबिवली कोपर आणि मग घर असा लांबचा पल्ला होता. साधारण 15 ते 16 किलोमीटर अंतर. ह्या मार्गाने आजच्या दिवसात घरी पोहोचणे कठीण होते. पण मी एखाद कि.मी. चाललो असेल आणि तो पाण्याचा पसारा इकडेही तसाच होता एकदम DEAD END. सगळीकडे नुसती गर्दी, पाण्यात गाड्या अडकलेल्या सगळकाही विस्कटलेलं. हताश करणारी परिथिती. घर आठवत होत आई आठवत होती. घराकडे निघालो होतो पण घरापासून लांब आलो असं वाटत होतं. डोळ्यात थोडी जागा शिल्लक होती पण तीही आता पाण्याने घेतली होती. बाजूला असलेल्या हातगाडीवर टेकलो. शांत झालो, पावसाचा जोर तसाच कायम होता अंधारही वाढला होता. आजच्या आज घरी जाण्याचा माझा विचार त्या अंधारात नाहीसा होताना मी बघत होतो. थोड्या वेळासाठी डोळे मिटले, पुन्हा त्याच रेल्वेच्या ब्रिजवर आलो. ४:१५ वाजले होते आता जरी सुरुवात केली तरी ७ वा पर्यंत दिव्याला पोहचू असा अंदाज बांधून मी track मध्ये उतरलो.
आता मात्र कठीण मग निवडला होता. त्याला ३ करणे आहेत, एक मला पोहता येत नाही, दोन पाण्याचा प्रवाह जोरात होता आणि तिसरा लवकरच अंधार होणार होता. पायाखाली track चा अंदाज येत नाही म्हणून वर overhead ची wire बघत वाटचाल सुरु केली तर खरी, पण त्या वाहत्या पाण्यातून चलन जोखमीच होतं. पायात बूट सतत पाण्यात राहिल्याने त्याची अवस्था दयनीय होती. माझ्या जरा पुढे चार जणांचा ग्रुप होता. ते एकमेकांचे हात पकडून चालले होते. मीही त्यांना join झालो. पायातला बूट नीट करण्यासाठी मी त्याचा हात सोडला. ५ मिनिट थांबू व निघू पण त्या पाण्यात उभं राहण कठीण. अंधार वाढला होता. दिव्याला पोहचलो की मग ताईकडे जातो या विचाराने थोडा सुखावलो. ७:३० ला मी सतत कंबरभर पाण्यातून चालत दिवा स्टेशनाला आलो. पण इथेही निराशा, ताईकडे जाणे शक्य नव्हते. एक मजलाभर पाणी आता तर platform वर थांबण्याखेरीज उपाय नव्हता. पण सगळा platform भरलेला होता. वर ब्रिज चढून आलो सगळ पाणीमय. एक दोन माळे पाण्याखालीच वर टेरेस गच्च भरलेले. डोंबिवलीच्या दिशेने पहिले तर समुद्राचा भास झाला. दोन झाडांची शेंडे तेवढे दिसत होते. बाजूला express Train मध्ये शिरलो एक जागा होती रिकामी लगेचच जाऊन बसलो. किती वेळाने असा सुखाने विसावलो होतो. पाय जणू नाहीतच मला अशी जाणीव झाली. आजूबाजूला राहणारे उरल सुरलं समान पोटाशी कवटाळून platform वर आसरा घेत होते. पूर्ण अंधार झाला होता. दूर कोठेतरी कुणीतरी लावलेल्या मेणबत्त्या झीलामिलात होत्या. पाऊस थांबला होता आणि आकाशही मोकालं झाल होतं. चंद्राच्या निळसर प्रकाशात दूरवर हलणारे पाणी मनात भीती निर्माण करत होते. खिडकीतून माझं लक्ष्य एका लाकडी पेटीवरच्या उंदरावर गेले. पाण्यात भिजून तो नुसता कुडकुडत होता. त्या पेटीच्या चाहु बाजूला पाणी होते पण समोरच्या बाजूला ५ फुटांवर पायऱ्या होत्या. ते अंतर त्याच्यासाठी जास्त होते. किमान सात आठ वेळा त्याने उडी मारण्याचा प्रयत्न केलाही. पण त्याला पेटीवर परतण्याशिवाय पर्याय नव्हता. आता मारलेली उडी त्याची शेवटची असेल असे मला वाटले कारण लगेचच पेटीवर परतणारा तो उंदीर वरच वेळ झाला तरी पेटीवर परतला नव्हता. माझी नजर त्याला वर पायऱ्यांवर शोधात होती. पण तो कुठेच दिसला नाही. मात्र काही वेळाने तो मला त्या पेटीच्या कडेलाच तरंगताना दिसला. पाण्याने त्याचा घात केला होता. त्या छोटा उंदराप्रमाणे किती लोकांचाही घात झाला असावा. पाऊस थांबला खरा पण खाली पाण्याची पातळी वाढतच होती. त्या उंदराच्या नादात पाणी ट्रेन मध्ये एक फुट वर आलं होत. मला तो उंदीर आठवला, आपली गत अशीच होते की काय ? अंगावर कट आला. दोन सीट सोडून एक वरचा बर्थ रिकामा होता मी मोर्चा तिकडे वळवला. भिजल्यामुळे थंडीही वाजत होती, झोप लागत होती पण खाली पाण्याची वाढणारी पातळी निवांत पडू देत नव्हती. खालचा बर्थ जवळजवळ बुडालाच. एक एक मिनिट तासासारखा वाटत होता. मी २५ तारखेला घर सोडल्यापासून ते आत्तापर्यंत घरच्यांशी काहीच संबंध साधता आला नव्हता. आई चेहरा डोळ्यासमोर येत होता. वेडिपीसी झाली असेल ती तर. पूर्ण दोन दिवस बाहेर तेही अशा परिस्थितीत. घरात काय चाललं असेल? डोक्यात हजार प्रश्नांनी गर्दी केली होती. पुन्हा एकदा डोळे पाणावले होते. प्रयत्न करून देखील शांत होता येत नव्हते. इतकी वाईट वेळ मी आयुष्यात कधीच अनुभवली नव्हती. आयुष्यात काही गोष्टी असतात, मग त्या चांगल्या असोत वा वाईट त्या विसरता येत नाहीत. हे दोन दिवस असेच आहेत कधीच न विसरता येणारे. मला पहाटेच्या वेळी थोडी झोप लागली. सहा वाजता मला ताडकन जाग आली. पाणी आता उरल नव्हत. track मध्ये देखील एखाद फुट पाणी होते.
थोडाही वेळ न गमावता bag घेऊन मी चालू पडलो. आजतर नक्की घर गाठू. डोंबिवली आणि दिव्याच्या साधारण मध्यावर एक शंकराचं मंदिर लागतं. मंदिरही अर्ध्याहून जास्त पाण्याखालीच होतं. आज देव स्वतः बुडाला होता. फटाफट अंतर कपात मी कोपरला येऊन पोहचलो. मनातून प्रचंड आनंदून गेलो होतो. इथून एका नाल्यावरून छोटा ब्रिज ओलांडून मी जवळ राहणाऱ्या आत्याकडे गेलो. बाजूच्या चाळीत गेलेलं पाणी काढण्यासाठी धावपळ चालू होती. आत्याकडे प्रथम ज्योत्स्नाने मला बघितलं व म्हणाली 'अरे सुन्या अवतार बघ कसा झालाय तुझा .... थांब पाणी आणते' . बाजूलाच आरश्यात चेहरा बघितला मीच घाबरलो. काळवंडलेला चेहरा, खोल आत गेलेले डोळे, विस्कटलेले आणि राकट केस ........ भयानक !! मी मनातच म्हटलं अवतार काय घेऊन बसलीस. कसा आलो इथपर्यंत ते माझं मलाच ठावूक.
आता मनावर वेगळंच दडपण होतं, घरी जाण्याचं. घरातल्या परिस्थितीला सामोरं जाण्याचं. घरी काय चालू असेल? घरातले सगळे व्यवस्थित असतील का ? घराजवळ पाणी असेल का ? असेल तर किती? प्रश्नांची गर्दी वाढतच होती. काकांच्या घराजवळ आलो तर एक अजून धक्का त्यांच्या बिल्डींगचा एक भाग कोसळला होता व दुसरा कधीही कोसळण्याच्या अवस्थेत होता. तळमजला अजून पाण्याखाली होता. त्या ठिकाणाहून एक चढाव पार केला की माझं घर. तिथे पाणी नसणार याची खात्री होती पण लवकरात लवकर घर गाठायची घाई झाली होती. मी बिल्डींग खाली होतो. घर आता काही क्षणाच्या अंतरावर होते. मी माझ्या gallery त होतो. आई धावतच घरातून बाहेर आली तिच्या त्या व्याकूळ चेहऱ्यावरून माझी नजर हटतच नव्हती. ती धावत येऊन मला बिलगली, जोरात कवटाळून हुंदके देत तिने मला गट्ट आवळल होतं. रडून मोठे आणि लालबुंद झालेल्या त्या तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा अशा काही लागल्या की दोन दिवसात पाहिलेलं पाणी मला त्यासमोर कमी वाटू लागलं. बाबांच्या डोळ्यातली चमक त्यांच्या मनातले भाव सांगून गेली. एकूणच घरातले वातावरण हळूहळू नॉर्मल होत गेले. घरी आल्यामुळे मीही सुखावलो होतो.
अश्या ह्या भिजलेल्या २६ जुलैने मला कधीही न विसारणाऱ्या आठवणींच भल मोठ गाठोड दिलं आहे आणि त्याचा ओलावा अजूनही मला जाणवतोय ......
Sunday, May 22, 2011
Thursday, May 19, 2011
चिंचेच झाड
माझ्या छोट्याश्या शाळेच्या छोट्याश्या ग्राउंडवर एक मोठ असं चिंचेच झाड होत. त्याचा पसारा बराच मोठा होता. ग्राउंडवर पडणाऱ्या सावलीमध्ये त्याचा वाटा मोठा असे. त्याचे खोड इतके मोठे होते की त्याला मिठी मारायची झाली तर तीघाचौघांना एकमेकांचे हात पकडून त्या भोवती उभे राहावं लागे. शाळेच्या मागच्याबाजूला बरीच झाडं होती. पण हे समोर असल्यामुळे ते सगळ्यांचे लाडके होते. जेव्हा झाडाला चिंच लागण्याचा हंगाम असायचा त्यावेळी सगळी मुलं त्यावर तटून पडलेली असायची. घरातून येताना कागदात मीठ बांधून आणायचे आणि मधल्यासुट्टीत चवीने चिंचा पाडून खायच्या हा कर्यक्रम ठरलेला असायचा. पूर्ण मधल्यासुट्टी चिंचा पाडण्यात जायची. सुट्टीची घंटा होताच पहिला दगड हातात घेऊन सुरु झालेला हा खेळ शेवटच्या घंटेपर्यंत चालायचा. आमच्या शाळेतल्या पाचसहा तासांचा जो काही वेळ असायचा त्यातला थोडातरी वेळ या झाडापाशी जायचा.
माझ्या वर्गात प्रसाद चव्हाण नावाचा माझा मित्र होता. माझ्यामते आमच्या सगळ्यांपैकी जास्त वेळ त्या झाडापाशी घालवला असेल तो प्रसादने. झाडावर दगडमारून चिंच पाडण्यात तो जामच माहीर होता. ते झाडं नसत तर प्रसादाचा बराचसा वेळ असाच वाया गेला असता. ते झाडं आणि प्रसाद एक वेगळाच समीकरण झालं होत जे आमच्या गणिताच्या सरानाही सोडवता आलं नसतं. चिंचेची कोवळी पानेसुधा खायला गोड लागतात, त्यामुळे चिंचा पडतांना पडलेली पानेहि खाल्ली जायची. चिंच खाल्ली की नंतर त्यातली चिंचुकाही भाजून खाल्ली जायची. पावसाळ्यात तर त्याच्या खालची बरीचशी जमीन कोरडीच रहायची त्यावरून त्याच्या विस्ताराची कल्पना येईल. त्या झाडाच्या चिंचेच तर मुलांना व्यसनच लागल होत. शाळेच्या वेळात शिक्षकांच्या भीतीने मुलांना झाडावर चढता येत नसे. त्यासाठी मुलं रविवारची सुट्टी साधत. तसं तर हे झाड वेगवेगळ्या तह्रेने आमच्या बरोबर असायचे. सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे खाण्याचा दृष्टीने तर होताच, बाकी आम्ही खेळण्यासाठी मैदानात असायचो तेव्हा ते आमच्यापैकीच एक असायचे. सोनसाखळी खेळताना एखादा झाडामागे गेला की त्याला पकडणे कठीणच. सोनसाखळीचा तो वेढा पकडण्यासाठी आला की झाडामुळे त्यांना एकमेकांचे हात सोडावे लागत, आणि तीच वेळ साधून पाळायला मिळत असे. लपाचुपी खेळताना लपण्याची ती एक चांगली जागा होती. शाळेचे स्पोर्ट्स असले की त्याच झाडाखाली बसण्यासाठी गर्दी होत असे. क्रिकेट खेळतानासुधा झाडाच्या सावलीत फिल्डिंग करण्यासाठी आमची भांडण होत असत. पतंगाच्या मोसमात बरेचशे पतंग झाडावर अडकलेले असायचे. चिंच काढायला झाडावर चढलो की पतंगाची सुधा कमाई होत असे. शाळेच्या सगळ्याच मजल्यांवरून आणि सगळ्याच वर्गातून ते झाड दिसायचे झाडावर झालेली थोडीशीही हालचाल लगेचच लक्ष वेधून घ्यायची, असेच एकदा हिंदीच्या तासाला वर्गात असताना बाहेर झाडावर चढलेल्या एका मुलामुळे माझं सार लक्ष तिकडेच केंदित झाल होत. नावाला मी वर्गात बसलो होतो आणि ते आमच्या शिक्षिकेलाहि कळले होते. मग काय बाकीच्या उरलेला तास उभा राहूनच गेला.
आमची जवळ जवळ ११ वर्षे त्या झाडाच्या सानिध्यात गेली. माझे आई बाबा जवळचे नातेवाईक व काही जवळचे मित्र सोडले तर मला जास्त ओळखणारे ते झाड होते. १९९९ सुमार, ५ नोव्हेंबर पासून दिवाळीची सुट्टी लागणार होती. कुणी गावाला, कुणी मामाकडे तर कुणी बाहेर फिरायला प्रत्येकाचा वेगवेगळे प्लान होता. शाळा सुटली होती, सगळेच तोंडावर आलेली दिवाळीची सुट्टी अनुभवायला आसुसलेले होते.
दिवाळीचे वीस पंचवीस दिवस अगदी मजेत गेले. सुट्टीनंतरचा पहिला दिवस उजाडला होता. माझ्या घरातून शाळा दिसत असे, मैदानात एकाच गर्दी झाली होती. सहसा प्रत्येकजण आपापल्या वर्गाबाहेर उभे राहत पण आज मैदानात गर्दी का हे जाणण्यासाठी मीही उत्सुक होतो. सगळे मित्र भेटणार ह्या विचाराने मी धावतच मैदानात आलो. मी जसा मैदानात गेटजवळ आलो तो तसाच जागीच उभा राहिलो, काहीतरी हरवलं होत शाळेचा आवार मोकळा आणि भकास वाटत होता. वास्तव कळायला मिनिटभर लागला पण जेव्हा कळलं तेव्हा तो क्षण मनात व हृदयात धडकी भरवणारा होता. शाळेची सावली लोप पावली होती, लपाचुपी खेळतानाची माझी लपण्याची आवडती जागा हरवली होती. तासोनतास झाडाबरोबर रमणाऱ्या प्रसादाची दगड मारण्याची जागा त्याने गमावली होती. सावलीत फिल्डिंग करण्यासाठी भांडणाच कारण आता उरल नव्हत, सोनसाखळीचा तासभर चालणारा खेळ आता क्षणार्धात संपायचा. सगळ्यांचच आवडतं चिंचेच झाड तोडलं होत. खांद्यावरच दप्तर शाळेच्याच खांबाजवळ काढून ठेवत मी मुलांच्या घोळक्यात शिरलो, सगळ संपलं होत उरल होत ते फक्त जमिनीपासून एक दीड फुट वर आलेलं त्याच खोड आणि झाड तोडताना सर्वत्र उडालेले त्याचे शेकडो तुकडे. जरा वेळासाठी मला सगळाच खोट वाटत होत पण ते सगळ वास्तव होत. त्या मोकळ्या झालेल्या वातावरणातही माझी घुसमट होत होती. मी त्या घोळक्यातून बाहेर पडलो आणि माझ्या वर्गाकडे निघालो. न राहून मी ते दृश्य सारखे पहातच होतो. शाळेचा आवार आता फाटल्यासारखा वाटत होता.
त्याच दरम्यान एखाद दोन आठवड्यानंतर रोटरी क्लब तर्फे वृक्ष रोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यावेळी त्या तोडलेल्या झाडाला सगळेच विसरले होते. त्याच्या तोडलेल्या खोडाचीही अडचण झाल्याने ते खोदुन त्यावर माती टाकून ते सपाट करण्यात आले होते.
ते झाड कोणी, का व कशासाठी तोडले असे अनेक प्रश्न आपलं डोकं वर काढत होते. पण आता विचार करणे व्यर्थ होते. सुरुवातीचा एक महिना शाळेतून आत शिरताना त्या तुटलेल्या खोडाकडे माझं लक्ष हमखास जायचेच. ते झाड तोडल्यामुळे निसर्गाचा तर काही प्रमाणात नाश झालाच, पण त्याच बरोबर मुलांची मनेही तोडली गेली होती. कारण त्या झाडाची मूळ सगळ्यांच्याच मनामध्ये खोलवर रुजली होती. वर्गात बसल्यावर आता मोकळा पण खायला उठणारा परिसर दिसत असे. आता बरेच आठवडे सरले ती मला वर्गात बसल्यावर कायम एक मित्र गैरहजर असल्याचा भास होत होता. शाळेच्या हजेरीपाटावर सगळी मुलं हजर असतं पण माझ्या मनाच्या हजेरीपटावर एकजण कायम गैरहजरच होता ...........
माझ्या वर्गात प्रसाद चव्हाण नावाचा माझा मित्र होता. माझ्यामते आमच्या सगळ्यांपैकी जास्त वेळ त्या झाडापाशी घालवला असेल तो प्रसादने. झाडावर दगडमारून चिंच पाडण्यात तो जामच माहीर होता. ते झाडं नसत तर प्रसादाचा बराचसा वेळ असाच वाया गेला असता. ते झाडं आणि प्रसाद एक वेगळाच समीकरण झालं होत जे आमच्या गणिताच्या सरानाही सोडवता आलं नसतं. चिंचेची कोवळी पानेसुधा खायला गोड लागतात, त्यामुळे चिंचा पडतांना पडलेली पानेहि खाल्ली जायची. चिंच खाल्ली की नंतर त्यातली चिंचुकाही भाजून खाल्ली जायची. पावसाळ्यात तर त्याच्या खालची बरीचशी जमीन कोरडीच रहायची त्यावरून त्याच्या विस्ताराची कल्पना येईल. त्या झाडाच्या चिंचेच तर मुलांना व्यसनच लागल होत. शाळेच्या वेळात शिक्षकांच्या भीतीने मुलांना झाडावर चढता येत नसे. त्यासाठी मुलं रविवारची सुट्टी साधत. तसं तर हे झाड वेगवेगळ्या तह्रेने आमच्या बरोबर असायचे. सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे खाण्याचा दृष्टीने तर होताच, बाकी आम्ही खेळण्यासाठी मैदानात असायचो तेव्हा ते आमच्यापैकीच एक असायचे. सोनसाखळी खेळताना एखादा झाडामागे गेला की त्याला पकडणे कठीणच. सोनसाखळीचा तो वेढा पकडण्यासाठी आला की झाडामुळे त्यांना एकमेकांचे हात सोडावे लागत, आणि तीच वेळ साधून पाळायला मिळत असे. लपाचुपी खेळताना लपण्याची ती एक चांगली जागा होती. शाळेचे स्पोर्ट्स असले की त्याच झाडाखाली बसण्यासाठी गर्दी होत असे. क्रिकेट खेळतानासुधा झाडाच्या सावलीत फिल्डिंग करण्यासाठी आमची भांडण होत असत. पतंगाच्या मोसमात बरेचशे पतंग झाडावर अडकलेले असायचे. चिंच काढायला झाडावर चढलो की पतंगाची सुधा कमाई होत असे. शाळेच्या सगळ्याच मजल्यांवरून आणि सगळ्याच वर्गातून ते झाड दिसायचे झाडावर झालेली थोडीशीही हालचाल लगेचच लक्ष वेधून घ्यायची, असेच एकदा हिंदीच्या तासाला वर्गात असताना बाहेर झाडावर चढलेल्या एका मुलामुळे माझं सार लक्ष तिकडेच केंदित झाल होत. नावाला मी वर्गात बसलो होतो आणि ते आमच्या शिक्षिकेलाहि कळले होते. मग काय बाकीच्या उरलेला तास उभा राहूनच गेला.
आमची जवळ जवळ ११ वर्षे त्या झाडाच्या सानिध्यात गेली. माझे आई बाबा जवळचे नातेवाईक व काही जवळचे मित्र सोडले तर मला जास्त ओळखणारे ते झाड होते. १९९९ सुमार, ५ नोव्हेंबर पासून दिवाळीची सुट्टी लागणार होती. कुणी गावाला, कुणी मामाकडे तर कुणी बाहेर फिरायला प्रत्येकाचा वेगवेगळे प्लान होता. शाळा सुटली होती, सगळेच तोंडावर आलेली दिवाळीची सुट्टी अनुभवायला आसुसलेले होते.
दिवाळीचे वीस पंचवीस दिवस अगदी मजेत गेले. सुट्टीनंतरचा पहिला दिवस उजाडला होता. माझ्या घरातून शाळा दिसत असे, मैदानात एकाच गर्दी झाली होती. सहसा प्रत्येकजण आपापल्या वर्गाबाहेर उभे राहत पण आज मैदानात गर्दी का हे जाणण्यासाठी मीही उत्सुक होतो. सगळे मित्र भेटणार ह्या विचाराने मी धावतच मैदानात आलो. मी जसा मैदानात गेटजवळ आलो तो तसाच जागीच उभा राहिलो, काहीतरी हरवलं होत शाळेचा आवार मोकळा आणि भकास वाटत होता. वास्तव कळायला मिनिटभर लागला पण जेव्हा कळलं तेव्हा तो क्षण मनात व हृदयात धडकी भरवणारा होता. शाळेची सावली लोप पावली होती, लपाचुपी खेळतानाची माझी लपण्याची आवडती जागा हरवली होती. तासोनतास झाडाबरोबर रमणाऱ्या प्रसादाची दगड मारण्याची जागा त्याने गमावली होती. सावलीत फिल्डिंग करण्यासाठी भांडणाच कारण आता उरल नव्हत, सोनसाखळीचा तासभर चालणारा खेळ आता क्षणार्धात संपायचा. सगळ्यांचच आवडतं चिंचेच झाड तोडलं होत. खांद्यावरच दप्तर शाळेच्याच खांबाजवळ काढून ठेवत मी मुलांच्या घोळक्यात शिरलो, सगळ संपलं होत उरल होत ते फक्त जमिनीपासून एक दीड फुट वर आलेलं त्याच खोड आणि झाड तोडताना सर्वत्र उडालेले त्याचे शेकडो तुकडे. जरा वेळासाठी मला सगळाच खोट वाटत होत पण ते सगळ वास्तव होत. त्या मोकळ्या झालेल्या वातावरणातही माझी घुसमट होत होती. मी त्या घोळक्यातून बाहेर पडलो आणि माझ्या वर्गाकडे निघालो. न राहून मी ते दृश्य सारखे पहातच होतो. शाळेचा आवार आता फाटल्यासारखा वाटत होता.
त्याच दरम्यान एखाद दोन आठवड्यानंतर रोटरी क्लब तर्फे वृक्ष रोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यावेळी त्या तोडलेल्या झाडाला सगळेच विसरले होते. त्याच्या तोडलेल्या खोडाचीही अडचण झाल्याने ते खोदुन त्यावर माती टाकून ते सपाट करण्यात आले होते.
ते झाड कोणी, का व कशासाठी तोडले असे अनेक प्रश्न आपलं डोकं वर काढत होते. पण आता विचार करणे व्यर्थ होते. सुरुवातीचा एक महिना शाळेतून आत शिरताना त्या तुटलेल्या खोडाकडे माझं लक्ष हमखास जायचेच. ते झाड तोडल्यामुळे निसर्गाचा तर काही प्रमाणात नाश झालाच, पण त्याच बरोबर मुलांची मनेही तोडली गेली होती. कारण त्या झाडाची मूळ सगळ्यांच्याच मनामध्ये खोलवर रुजली होती. वर्गात बसल्यावर आता मोकळा पण खायला उठणारा परिसर दिसत असे. आता बरेच आठवडे सरले ती मला वर्गात बसल्यावर कायम एक मित्र गैरहजर असल्याचा भास होत होता. शाळेच्या हजेरीपाटावर सगळी मुलं हजर असतं पण माझ्या मनाच्या हजेरीपटावर एकजण कायम गैरहजरच होता ...........
Monday, May 16, 2011
Saturday, May 14, 2011
Friday, May 13, 2011
Wednesday, May 11, 2011
Tuesday, May 10, 2011
Subscribe to:
Comments (Atom)
































